हिंदू परंपरेत अनेक गोष्टींचा काही ना काही अर्थ असतो .मशानात अग्नी नसतो म्हणून तो घरातून नेतात .तसा तो आजही नेतात .त्यामागे कारण असे असू शकते की आपल्या माणसाला अग्नी द्यायचा आहे तर तो आपल्या घरातूनच न्यायला हवा ,त्यासाठी मडक्यात सुकलेले शेण टाकून त्यावर अगरबत्ती पेटवून ठेवतात ती स्मशानापर्यंत पेटलेली असते . धान्य पेरले जाते त्यामागे असे शास्त्र असू शकते की मेलेला माणूस जर भुत होऊन स्मशानातून येत असेल तर तो ते धान्य गोळा करीत येतो .ते धान्य जमा करी पर्यंत सूर्य मावळतो त्यामूळे तो भूत होऊन घरी येऊ शकत नाही .स्मशानात प्रेत पेटविल्यावर मडक्यातून पाणी सांडत फिरविले जाते ती त्याला एकप्रकारे लक्ष्मण रेषा असते त्या बाहेर तो येत नाही .
गुलबाकवली, गुलबकावली, गुल-ए-बकावली या वेगवेगळया नावांनी ओळखली जाणारी अरेबियन नाईट्ससारख्या सुप्रसिद्ध कथांच्या समृध्द शृंखलेतीलच दर्जेदार, रहस्यकथा आहे.‘गुलबकावली’ची गोष्ट तर थोडी चमत्कारिकच आहे. तिची बालवाङ्मयात ज्यानं नोंद केली त्याला वंदन! अनेक लेखकांनी आणि प्रकाशकांनी ही गोष्ट लिहिली/प्रकाशित केली आहे. प्रत्येक आवृत्तीत मनसोक्त बदल केले आहेत. कथेचा नायक ताज-उल्-मुल्क जिच्या प्रेमात पडतो ती गुलबकावली इंद्राच्या दरबारातली अप्सरा आहे. तिच्या नात्यातल्या वर्तुळातल्या स्त्रियांची नावं विविध धर्मांतली आहेत. विविधतेत एकता किंवा सर्वधर्मसमभावाचा अजाणता झालेला हा पहिला प्रयत्न असावा! मुळ पर्शियन भाषेतील ही रहस्यकथा लेखक शेख इझ्झातुल्लाह बंगाली यांनी इ.स.16O5 मध्ये लिहीली होती. ( गुल-ए-बकावली शैख़ इज़्ज़तदुल्लाह बंगाली मुंशी नवल किशोर, लखनऊ यांनी 1954 मध्ये पुनर्प्रकाशित केली.) ज्याची नहल चाँद लाहोरी यांनी उर्दूमध्ये भाषांतर केले. भारतात उत्तम लोककथा, दिर्घकथा म्हणूनही गुलबकावली प्रसिध्दी पावली.आम्ही लहान असतांनी आजोबा गुलबकावलीची गोष्ट सांगत तेंव्हा संपुर्ण गावही गोष्ट मन लावून ऐकायचा क...
Comments
Post a Comment